सीमाप्रश्‍नी वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल कर्नाटक सरकारचा विधान परिषदेत निषेध

0

 मुंबईदि. 25 : सीमाप्रश्‍नी वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल कर्नाटक सरकारचा आज विधान परिषदेत निषेध करण्यात आला.कर्नाटक-बेळगाव सीमाप्रश्न न्यायप्रविष्ट असताना कर्नाटक सरकारने सोलापूर आणि अक्कलकोट बदल्यात बेळगाव कर्नाटकला मिळाल्याने सीमाप्रश्न अस्तित्वातच नाही, असे वक्तव्य कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. या विधानामुळे मराठी भाषिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला असून त्याबाबत विधान परिषद सदस्य दिवाकर रावते यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित करून निषेध नोंदवला होता. यावर सर्व सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन कर्नाटक सरकारचा विधानपरिषदेत एकमताने निषेध नोंदविण्यात आला.

About Author

error: Content is protected !!

Maintain by Designwell Infotech